अँग्री यंग मॅन म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानंदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीनेदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत विराटने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते, BCCIशी त्याचं बोलणंही झालं होतं. मात्र अखेर आज या निर्णयावर त्याने शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला आ
Virat Kohli कोहलीची पोस्ट नेमकी काय?
निवृत्तीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टावर विराट एक पोस्ट केली आहे ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात.
मी या फॉरमॅटपासून दूर जातोय ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटत असल्याचे विराटनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी माझे सर्वस्व दिले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन असे म्हणत विराटने #269, साइनिंग ऑफ अशा शब्दांच त्याच्या निवृतीच्या पोस्टचा शेवट केला आहे.
Virat Kohli ते स्वप्न अखेर अधुरंच…
विराटने इन्स्टावरील पोस्टमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या. कसोटी क्रिकेटमधील हा प्रवास मी हसतमुखाने पाहीन असं त्याने लिहीलं असलं तरी आयुष्यातील एक स्वप्न अधुरं राहिल्याचं दु:ख कायम त्याच्या मनात सलत राहील. विराटचं ते स्वप्न कसोटीतील 10 हजार धावांशी निगडीत आहे. ते पूर्ण न करताच त्याने कसोटी क्रिकेटच्या या फॉरमॅटला अलविदा केलंय.
Virat Kohli विराटचं टेस्ट करिअर
विराट कोहलीने त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 123 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. पण विराट त्याच्या 10 हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा 770 धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतकं आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ समान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत.