महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्या असतानाच भाजपने शिवसेना (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray जळगावमध्ये ठाकरे गटाला खिंडार
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ठाकरे गटाच्या तीन माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Uddhav Thackeray ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश
दशरथ महाजन – ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख
किशोर निंबाळकर – माजी नगराध्यक्ष
राजेंद्र चौधरी – माजी नगराध्यक्ष
भगवान महाजन – अपक्ष नेते
Uddhav Thackeray इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवक
या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) कमकुवत होत चालली आहे, तर भाजपचा प्रभाव वाढत आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच!
सध्या राज्यभर शिवसेना (शिंदे गट) “ऑपरेशन टायगर” राबवत असून, उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. कालच, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, मुंबईतील तीन माजी नगरसेवक आणि अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश झाला.
आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर आणि गंगापूर मतदारसंघात यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश मोठ्या राजकीय घडामोडींचा भाग मानले जात आहेत. भाजप आणि शिंदे गटात ठाकरे गटाच्या नेत्यांचे प्रवेश सुरूच राहिल्यास, आगामी निवडणुकीत मोठे परिणाम दिसून येऊ शकतात.