जव्हार: भाजप विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती झाली आणि ते तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने डोंगरी, सागरी आणि शहरी भाग असलेल्या पालघरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.यात सगळ्यांत महायुतीचा वाटा आला तरी, पालघर जिल्ह्यात सहा विधानसभांपैकी चार विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ठरवीत उमेदवाराना ४० हजार मताधिक्यापेक्षा अधिकच्या फरकाने निवडून आणल्याने राजकारणातील चाणक्य कॅप्टन विनीत मुकणे यांनी आपले पालघर जील्ह्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले .
पालघर जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी करीत महायुतीचे उमेदवार निश्चित करणे तसेच पक्ष श्रेष्ठीना दिलेला शब्द विजयात बदलण्याकरिता मुकणे यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती, हे आव्हान स्वीकारत धैर्य प्राप्तीसाठी अहोरात्र मेहनत फळाला येवून पालघर राजेंद्र गावित ४० हजार,बोईसर विलास तरे ४५ हजार,वसई स्नेहा दुबे पंडित – ३२ हजार, हरी भोये ४१ हजार मताधिक्याने निवडून आणून जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर घातली.
CM होताच फडणवीसांनी बाहेर काढले खास पत्ते, गृह खात्यावर विचारताच जोरात हसले
सन २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना पालघर जिल्ह्यातील जव्हार या ऐतिहासिक नगरीत मुकणे यांनी पाचारण करीत येथील जनतेच्या पाण्याची समस्या मिटवित १७ कोटींची खडखड नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तद्नंतर जव्हार शहरातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी म्हणून दोनशे खाटाचे रुग्णालय मंजूर केले, येथील क दर्जाचे पर्यटन असल्याचे वर्गीकरण सुधारून ब दर्जात रूपांतर केले, येथील कुपोषण मुक्ती, रोजगार, आरोग्य व्यवस्था आणि बऱ्याच काही बाबींवर काम सुरू असल्याचे मुकणे यांनी सांगितले.
कॅप्टन विनीत मुकणे हे पालघर जिल्ह्यातील युवा नेतृत्व आहे, त्यांचा समय सूचकपणा वाखण्याजोगा आहे.त्यांनी पालघर जिल्ह्यात महायुतीचे चार आमदार निवडून आणण्याकरिता विशेष प्रयत्न केले आणि त्यास यश देखील आले.त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य