गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे झाली आहे .तेथे सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत २६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत झालेली पावसाची नोंद (जिल्हानिहाय)
रत्नागिरी
दापोली – २३० मिमी
मंडणगड – १६८ मिमी
चिपळूण – १५० मिमी
संगमेश्वर – १३४ मिमी
लांजा – २१४.५ मिमी
खेड – १५५ मिमी
गुहागर – १२२ मिमी
सिंधुदुर्ग
वैभववाडी – २३० मिमी
दोडामार्ग – ६० मिमी
मालवण – ५८ मिमी
कुडाळ – ९८ मिमी
कणकवली – १२० मिमी
मुळदे – १०३.४ मिमी
रामेश्वर – ११६.२ मिमी
सावंतवाडी – ९३ मिमी
देवगड – १३१ मिमी
कोल्हापूर
राधानगरी – २२१ मिमी
गगनबावडा – २६१ मिमी
कागल – ६६ मिमी
शाहूवाडी – १६१ मिमी
पन्हाळा – ४७ मिमी
चंदगड – ४६ मिमी
आजरा – ३५ मिमी
गडहिंग्लज – ५७ मिमी
हातकणंगले – ५८ मिमी
शिरोळ – १३ मिमी
सांगली
वाळवा- १६ मिमी
तासगाव – १४ मिमी
शिराळा – ५३ मिमी
आटपाडी – १९ मिमी
कडेगाव – २० मिमी
कवठे महाकाळ- ६ मिमी
पलूस – ७ मिमी
कसबेडिगरज- २३.८ मिमी
मिरज – २६ मिमी
कोकरुड – ५६ मिमी
संख- १८ मिमी
पुणे
लवाळे – ४६.५ मिमी
पाषाण – ४३ मिमी
चिंचवड – ३९.५ मिमी
शिवाजीनगर – ३५.२ मिमी
तळेगाव – ३४ मिमी
हडपसर – २०.५ मिमी
मगरपट्टा – २०.५ मिमी
हवेली – १६.५ मिमी
गिरीवन – १०.५
निमगिरी – ९ मिमी
डुडुळगाव – ८.५ मिमी
राजगुरुनगर – ६.५ मिमी
बारामती – ६.२ मिमी
दौंड – ५.५ मिमी
ढमढेरे – ४ मिमी
दापोडी – ४ मिमी
माळिन – ३ मिमी
घाट परिसरातील २४ तासांत झालेला पाऊस
ताम्हिणी – ३२० मिमी
नवजा- ३०८ मिमी
दाजीपूर – ३०३ मिमी
डोंगरवाडी – २७१ मिमी
भिरा- २६१ मिमी
गगनबावडा – २६० मिमी
माथेरान – २५५ मिमी
गजापूर – २३९ मिमी
सावर्डे – २३३ मिमी
वरंडोली – २२६ मिमी
दवडी – २२५ मिमी
आंबोली – २२२ मिमी
पोफळी- २१५ मामी
शिरगाव – २१० मिमी
भालवडी – २०६ मिमी
मांडुकली – २०४ मिमी
कोयनानगर – २०७ मिमी
आंबवणे – १९६ मिमी
दूधगंगा – १९३ मिमी
घिसर – १९२ मिमी
लोणावळा- १८९ मिमी
कुंभेरी – १८० मिमी
महाबळेश्वर – १७३ मिमी
खंडाळा – १६७ मिमी
पुणेकरांनाही पावसाने झोडपले, खडकवासल्यातून मोठा विसर्ग
मुंबईपाठोपाठ पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 9659 क्युसेक वाढवून दुपारी 01.00 वा.11878 क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील पावसामुळे 10 जणांचा मृत्यू
मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू तर, मुंबईत एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला आहे.
हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित
रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित केल्या असून, मुख्य मार्गांवरील जलद सेवांनाही फटका बसला आहे.
सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प!
सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प! वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.