24.8 C
New York

Rahul Gandhi : मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्याने माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती

Published:

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly elections)(Vote Chori) झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. भाजपने (BJP) हा निवडणूक आयोगाला (Election Commission) हाताशी धरून मतचोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आता राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल आहे. त्यावरील सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली.

Rahul Gandhi राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर…

मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपाचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे.

न्यायालयात दिलेल्या या माहितीमध्ये असेही लिहिले आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल राहुल गांधी यांना संपूर्ण आदर आहे. तरीही हा खटला जसाजसा पुढे जातो आहे, तस तसा वाढणारा दबाव आणि बाहेरील असामान्य परिस्थिती यांची न्यायालयाने दखल घेतली पाहिजे. ज्या विचारधारेच्या लोकांनी हा खटला दाखल केला आहे, ते समाजात तेढ निर्माण करण्यासाठी धार्मिक वातावरण कलुषित करण्यासाठी, निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी आणि ठराविक उद्योजकांचे भले करण्यासाठीपरिचित आहे, असे लेखी माहितीमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img