35.5 C
New York

Health Tips : मिठाचा वापर योग्य प्रमाणात असावा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आरोग्य समस्या

Published:

मीठ आपल्या जेवणाची चव वाढवणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला इतकं लहान, पण अत्यावश्यक असलेल्या या पदार्थाविना कोणताही जेवण पूर्ण होऊ शकत नाही. कित्येक लोकांसाठी मीठ हा अनिवार्य घटक असतो; ताटात थोडे कमी असलं तरी चालेल, पण मीठाशिवाय अन्न खाण्याची कल्पनाही ते करू शकत नाहीत. पण, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की मीठाचं सेवन योग्य प्रमाणातच करावं, कारण त्याचे अती सेवन शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

जरी मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक असलं तरी, त्याचे जास्त सेवन विविध आरोग्य समस्यांकरता कारण ठरू शकते. डब्ल्यूएचओ (WHO) च्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात 5 ग्रॅम (1 चमचं) पेक्षा जास्त मीठ खाणं टाळावं. परंतु भारतात काही लोक 10-15 ग्रॅम मीठ एका दिवसात खाल्ले जातात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीची समस्या होऊ शकते.

दिल्लीतील धर्मशाला नारायण रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कपिल कुमार कुर्शीवाल यांच्यानुसार, 5 ग्रॅम मीठ शरीराला 2000 मिलीग्राम सोडियम पुरवते. या सोडियमच्या अती सेवनामुळे रक्तदाब वाढतो, तसेच किडनीवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता देखील असते.

अत्यधिक मीठ सेवन केल्यास पचनप्रणालीवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. पोट फुगणे, गॅस, आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, जर दीर्घकाळ मीठाचं सेवन जास्त होत राहिलं, तर पचनक्रिया बिघडण्याच्या तक्रारी वाढू शकतात.

जर तुम्ही जास्त मीठ घेत असाल, तर तुमच्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी मीठाची मात्रा कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे.

मीठाच्या अती सेवनामुळे हाडांचं आरोग्यही प्रभावित होऊ शकतं. जास्त मीठ घेतल्यास शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन हाडं कमकुवत होऊ शकतात. यामुळे हाडे मोडण्याची किंवा इतर अस्थि समस्यांची शक्यता वाढते.

मीठ खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण त्याचं प्रमाण योग्य ठेवणं हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. जास्त मीठ सेवन केल्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे मीठाचे सेवन नियंत्रणात ठेवणे हे आपल्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्याला हवं असलेलं मीठ आपल्या आहारात योग्य प्रमाणातच असावं, ज्यामुळे त्याचे फायदे अधिक चांगले दिसून येतात आणि आरोग्य समस्यांपासून बचाव होतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img