मुसळधार पाऊस सध्या राज्यभरातच अनेक ठिकाणी कोसळत आहे. (Pandharpur Wari) (Rain) पुण्यातही पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे 58 हजार 585 क्युसेक उजनीक धरणाडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. उजनी धरणाची पाणी पातळी सध्या झपाट्याने वाढत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यामुळे आषाढी सोहळ्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठी पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या आहेत.
Pandharpur Wari धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी
जून महिन्यातच एवढा प्रचंड पाणीसाठा जमा होऊ लागल्याने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरण 75 टक्के वर गेल्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असून 75 टक्के एवढी धरणाची पातळी आषाढी यात्रा संपेपर्यंत कायम ठेवण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे आता येईल ते सर्व पाणी पंढरपुरात महापूर येणार नाही याची दक्षता घेत भीमा नदीमध्ये सोडून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
उजनी धरणातून आज जर धरणाने 75 टक्के पर्यंत पाणी पातळी गाठल्यास भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. 60 हजार क्युसिक विसर्गने जवळपास पाणी धरणाकडे येत असल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे.
Pandharpur Wari धोकादायक पुलावरून वाहतूक
नांदेडमध्ये कंधार- नायगांव तालुक्याला जोडणाऱ्या कौठा गावाजवळचा पुल धोकादायक बनलाय, तब्बल 60 वर्षांहून अधिक जीर्ण असलेल्या या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत. या पुलावरून अनेकदा वाहन खाली पडून अपघात झाले आहेत. दरम्यान, याच रस्त्यावरून पर्यटक कंधारचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येजा करतात. स्थानिकांनी या ठिकाणच्या पुलाची त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.