मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ ( Kundmala Bridge Collapse) काल इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी (Indrayani river bridge) पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडले. नक्की हानी किती झाली आहे? याचा अंदाज आला नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Mns)या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं मनसे प्रमुख सोशल मिडिया पोस्ट करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.
सत्तेचा अनुभव नक्की कुठला?
पूर्ण प्रवेशबंदी हा पूल धोकादायक होता तर तिथे का नाही झाली, हा प्रश्न आहेच. पूल जर धोकादायक झाला होता, नव्याने तर तो पाडून पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेनंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक (Pune News) प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? इतके विभाग सरकारचे आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं, तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत? त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल, तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत?पण राज्याला तुमच्या सत्तेचा अनुभव जर येत नसतील तर मग नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग काय उपयोग?
सरकार जर निष्काळजीपणा…
पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा.आपल्या कुटुंबाला अशा धोकादायक ठिकाणी जाताना, घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल, तर आपणच सतर्क राहायला हवं. आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे, तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, हे पाहावं असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.