23.5 C
New York

Bacchu Kadu Protest : बच्चू कडूंचं उपोषण गंभीर टप्प्यात; प्रकृती खालावली, राज्यभरात आंदोलनाचं सावट!

Published:

प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. मागील सात दिवसांपासून त्यांनी पाणी आणि औषधांशिवाय अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीत घसरगुंडी झाली होती त्यांना उलट्याही झाल्या तरीही त्यांनी आपलं आंदोलन थांबवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालानुसार बच्चू कडू यांना तात्काळ ICU मध्ये हलवणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे की, जर त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप झाला नाही, तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे. मात्र, स्वतः बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून त्यांनी अजूनही उपोषण सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अमरावतीमध्ये आंदोलनस्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. सध्याचं वातावरण तणावपूर्ण असून, आंदोलनस्थळ पोलीस छावणीसारखं भासत आहे. तरीही हजारो समर्थक कडू यांच्या पाठिशी उभे असून अनेक ठिकाणी प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलनाला जोरदार साथ दिली आहे. काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि दुपारी 2 वाजता मंत्री पंकजा मुंडे कडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर कडू काय भूमिका घेतात, याकडे राज्यभरात लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर बच्चू कडू हे आज आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत आंदोलन मागे घ्यायचं की पुढे न्यायचं यावर निर्णय घेणार आहेत.

कडू यांचे आंदोलन केवळ व्यक्तिगत नाही, तर संपूर्ण ग्रामीण आणि शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर आधारित आहे. त्यांच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  1. शेतमालाला किमान हमीभावावर 20% अनुदान द्यावं
  2. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 लाखांची मदत व संपूर्ण कर्जमाफी
  3. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावं
  4. धनगर बेरोजगार तरुणांना 13% नोकरी आरक्षण
  5. दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा 6000 रुपये मानधन
  6. ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांसाठी किमान 5 लाख रुपये अनुदान

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img