20 C
New York

Monsoon : मान्सून आला, हे कोणत्या निकषांवर ठरवले जाते ?

Published:

२४ मे रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये (kerala) पोहोचला आहे, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले.त्याआधी १३ मे रोजी मान्सून दक्षिण निकोबार बेटांवर दाखल झाला.पण, मान्सून आला म्हणजे काय? त्याच्या अंगमनाच्या वेळा कक्ष निश्चित केल्या गेल्या आहेत. आणि तो आला हे कोणत्या निकषांवर जाहीर केले जाते, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

यंदा केरळमध्ये नियमित वेळेच्या आधी आठ दिवस आणि महाराष्ट्रात नियमित वेळेच्या आधी तब्बल १२ दिवस आधी मान्सून दाखल झाले आहे. जून ते सप्टेंबर हा अधिकृतपणे चालणारा नैऋत्य मान्सून हंगाम संपूर्ण भारतासाठी आणि बहुतेक राज्यांसाठी सर्वात जास्त पावसाचा काळ असतो. हे चार महिने पावसाळी असण्याचे कारण म्हणजे त्या काळात होणारे वातावरणीय बदल. ही बदल देशात मान्सूनचा पाऊस सुरू झाला., ही निश्चित करतात. साधारणपणे १ जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात. ८ जुलैपर्यंत हे वारे संपूर्ण देश व्यापतात आणि ३० सप्टेंबर रोजी भारताच्या वायव्य प्रदेशांमधून ते परतण्यास सुरुवात होते. म्हणूनच हा चार महिन्यांचा म्हणजे जून ते सप्टेंबर हा कालावधी मान्सूनच्या पावसाचा काळ म्हटलं जातो. तथापि, ज्या दिवशी मोसमी वारे विशिष्ट प्रदेशांवर विकसित होतात, त्या दिवशी मान्सून त्या प्रदेशातून दाखल झाला, असे म्हटले जाते. पण, केरळमध्ये दाखल होताना, त्यांची जी तीव्रता असते, ती पुढे कायम राहतेच असे नाही, म्हणून देशभरात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो.

मान्सून सामान्यतः केरळच्या किनाऱ्यावर १ जून रोजी पोहोचतो, परंतु अंदमान (Andaman) आणि निकोबार (Nicobar) बेटांवर तो २२ मे दाखल होतो, असे मान्सूनच्या गेल्या कित्येक दशकांच्या अभ्यासातून ठरवलेले सामान्य अनुमान आहे. पण, मान्सून दाखल झाला, ही ठरवण्यासाठी भारतीय हवामान खात्याने नेमके कोणते निकष ठरवले आहेत, ही आपण पाहू. ऋतूच्या नावावरूनच पहिला निकष तपासला जातो, तो म्हणजे नैऋत्य दिशेवरून वारे वहात आहेत का? या वाऱ्यांचा उगम दक्षिण गोलार्धातील मस्करेन बेटे म्हणजेच मॉरिशस आणि रॉड्रिग्ज बेटे येथे होतो. आणि भारताच्या नैऋत्येकडून वाहत ते बंगालच्या उपसागरात येतात. दूसरा निकष असा आहे की, ही वारे समुद्रसपाटीपासून सुमारे ७५० मीटर उंचीवर वाऱ्याच्या वेगाचा ताशी १५-२० नॉट्स असावा. त्याचवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे ६०० मिलीबार म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे ४-४.५ किमी उंचीपर्यंत वाहिले पाहिजेत.

मान्सूनची सुरुवात जाहीर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे पाऊस. केरळमध्ये १४ हवामान केंद्रे आहेत.यातील मिनिकॉय (Minicoy) , अमिनी (Amini), तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram), पुनालूर (Pulanur), कोल्लम (Kollam), अलाप्पुझा (Alappuzha), कोट्टायम (Kottayum), कोची (Kochi), त्रिशूर (Thrisur), कोझिकोड (Kozhikode), थलासेरी (Thalsiri), कन्नूर (Kannur), केसरगोड (Kosrgod) आणि मंगळुरू (Manglore) या 8 ते 9 केंद्रांवर म्हणजेच 60% केंद्रांवर सलग दोन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 2.5 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला जायला हवा.

केवळ वारेच मान्सून बनवत नाहीत, कारण वर्षाच्या इतर वेळीही पश्चिमेकडील वारे येऊ शकतात. अशा वाऱ्यांसोबत वातावरणात आर्द्रता आणि ढग देखील असले पाहिजेत, जे पावसासाठी आवश्यक असतात. वास्तविक ही सारी स्थिती वर्षातून एकदाच म्हणजे मे-जूनमध्ये निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणून नैऋत्य मान्सून जूनमध्ये भारतात आला, असे म्हटले जाते. बऱ्याचदा या मान्सूनच्या वाऱ्यांच्या वाटचालीत भारतीय भूभागावर मे महिन्यात तयार होणारे कमी दाबाचे हवेचे पट्टे विपरीत परिणाम करतात, अशावेळी मान्सूनचे आगमन लांबते. पण, यावर्षी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे निर्माण न झाल्याने नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळपाठोपाठ महाराष्ट्रात अगदी मुंबईपर्यंत दाखल झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img