आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम हे अत्यंत आवश्यक पोषक तत्त्व आहे. हाच कॅल्शियमचा प्रमुख स्रोत म्हणजे दूध. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी दूध आरोग्यदायी मानले जाते. गाय आणि म्हशीचे दूध विशेषतः फायदेशीर असून, त्यात शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात.
आजकाल बहुतांश लोक बाजारातून पॅकेज्ड दूध खरेदी करून वापरतात. अशा दुधासंदर्भात एक प्रश्न सर्वसामान्यपणे उपस्थित होतो — हे दूध उकळून प्यावे का, की तसेच कच्चे प्यावे?
याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता सांगतात की, पॅकेज्ड दूध नेहमी उकळूनच प्यावे. कारण हे दूध तयार होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचताना अनेक प्रक्रिया आणि वेळ लागतो. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते. उकळल्यामुळे हे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दूध सुरक्षित होते.
तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, ज्यांची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे, जसे की नियमित व्यायाम करणारे किंवा ऍथलीट्स, त्यांनी कधी कधी कच्चे दूध प्यायल्यास चालते. मात्र, ज्यांची शरीररचना अधिक संवेदनशील आहे, त्यांनी कोणतेही धोका न पत्करता दूध उकळूनच प्यावे.
दूध उकळल्याने केवळ बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत तर त्यात असलेली काही हानिकारक रसायनेही निष्प्रभ होतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की उकळल्याने दूध दीर्घकाळ टिकते आणि लवकर नासण्याची शक्यता कमी होते.
पॅकेज्ड दूध हे पाश्चरायझेशन प्रक्रियेमधून जात असल्यामुळे त्यात आधीच काही प्रमाणात बॅक्टेरिया नष्ट केलेले असतात. हे दूध लो फॅट असते आणि वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. शिवाय, त्यात कॅल्शियम आणि प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्याने हाडं आणि दात मजबूत राहतात.
दूध हे शरीरासाठी एक संपूर्ण अन्न आहे. पॅकेज्ड दूध घेताना योग्य पद्धतीने उकळून पिल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात. उकळण्यामुळे दूधातील हानिकारक घटक नष्ट होतात आणि आरोग्यास सुरक्षित राहते. म्हणून, सर्वसामान्य व्यक्तींनी नेहमी दूध उकळूनच सेवन करावे.