25.8 C
New York

Foreign vegetables : भारतीय वाटणाऱ्या परदेशी भाज्या आपल्या ताटातलं जागतिक थाट!

Published:





आपण रोज ज्या भाज्या खातो – बटाटा, टोमॅटो, भेंडी, मिरची, बीन्स – त्या पाहून कोणालाही वाटेल की या आपल्याच भूमीच्या आहेत. पण खरं बघितलं, तर या सगळ्या भाज्यांचं मूळ भारताबाहेरचं आहे. जगभरातून या आपल्या देशात आल्या, रुजल्या आणि आपल्याला इतक्या प्रिय झाल्या की त्यांच्याशिवाय आज ताट अपुरं वाटतं!

बटाटा (Potato) –

बटाटा म्हणजेच आपल्या रोजच्या जेवणातला हिरा, पण तो खरं तर पेरू आणि बोलिव्हियामधून भारतात आला. पोर्तुगाली व्यापाऱ्यांनी 1600 च्या सुमारास बटाटा भारतात आणला. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. बटाट्याशिवाय वडा-पाव, पराठा किंवा भाजीची कल्पनाच करवत नाही!

टोमॅटो (Tomato) –

मेक्सिकोमधून आलेला टोमॅटो सुरुवातीला भारतीय लोकांना संशयास्पद वाटायचा – काहींनी तर याला विषारीही मानलं! पण जेव्हा भारतीय स्वयंपाकात टोमॅटोची आंबट-गोड चव मिसळली, तेव्हा तो नक्कीच “लव्ह अ‍ॅपल” ठरला. भारत आता टोमॅटो उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भेंडी (Lady Finger) –

भेंडीचा उगम इथिओपिया आणि पूर्व आफ्रिकेत. बाराव्या शतकात भारतात आली. भेंडीचे फायदे – फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन C – यामुळे ती आरोग्यासाठी उत्तम आहे. भारत आज जगात सर्वाधिक भेंडी उत्पादक देश आहे.

मिरची (Green Chilli) –

मिरची नसलेलं भारतीय जेवण म्हणजे रंगाविना साडी! मिरची भारतात येण्याआधी काळी मिरी आणि आलं प्रमुख होते. पण वास्को-द-गामाने मिरची भारतात आणली आणि जेवणाची चवच बदलली. आता भारत सर्वात जास्त मिरची उत्पादक व निर्यात करणारा देश आहे.

बीन्स (Beans) –

मध्य व दक्षिण अमेरिकेतील बीन्स भारतात पोर्तुगाल आणि स्पेनच्या व्यापाऱ्यांनी आणल्या. हल्ली फ्रेंच बीन्स, क्लस्टर बीन्सपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स स्वयंपाकात दिसतात – कोरड्या भाजीपासून पुलावात वापरल्या जातात.

फ्लॉवर (कॉलीफ्लॉवर)

ब्रिटिशांनी फ्लॉवर भारतात आणला १८व्या शतकात. गोभी मंचुरियन, आलू-गोभी, आणि गोभी पराठा हे प्रकार भारतीयांमध्ये आज बरेच प्रसिद्ध आहेत.

पालक (Spinch)

पालक हा मध्य आशियात उगम पावलेला आहे. यात आयरन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत. पालक पनीर आणि पालक पराठा तर सगळ्यांच्याच आवडीचे!

कोबी (Cabbage)

कोबी ब्रिटिश काळात भारतात आली. कोबीची चव आणि रचना भारतीय स्वयंपाकात अगदी सहज मिसळली. सूप, थोरन, मंचुरियन यासारख्या पदार्थांनी तिची लोकप्रियता वाढवली.

शिमला मिरची (Capsicum)

शिमला मिरची, जी मध्य अमेरिकेतील आहे, ती भारतात पुर्तगालच्या माध्यमातून आली. तिच्या लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांनी स्वयंपाकात फक्त चव नाही, तर सौंदर्यही दिलं!

बीट (Beetroot ) –

बीट रूटची मूळ भूमध्य सागरातली. ती शरीराला ऊर्जा देते आणि रक्तशुद्धीही करते. हल्ली सलाड, पराठा, जूस आणि केकसुद्धा बीटपासून तयार होतात.

या भाज्या भारतात कशा रुजल्या?

या सगळ्या भाज्या भारतात आल्या तेव्हा लोकांनी त्यांचं तात्काळ स्वागत केलं असं नाही. पण भारताची विविध हवामान रचना आणि स्थानिक शेतकऱ्यांची मेहनत यांनी त्या रुजवल्या. त्यात भारतीय मसाले आणि पाककृतींनी या भाज्यांना “भारतीय नागरिकत्व” मिळवून दिलं!

  • “टमाटर” हा शब्द स्पॅनिश भाषेतील “Tomatl” वरून आला आहे.
  • मिरचीपेक्षा पूर्वी काळी मिरीचा वापर “तिखट” म्हणून केला जायचा, आणि ती सोन्यासारखी महाग होती.
  • बटाट्याच्या पहिल्या वाफा उत्सव पेरूमध्ये आजही साजरे होतात.

परदेशातून आलेल्या या भाज्या आता आपल्या स्वयंपाकघराचा गाभा बनल्या आहेत. आपल्याला कधी वाटलंच नाही की आपली “भारतीय” भाजी परदेशातली आहे! पण चव, आरोग्य आणि विविधतेच्या दृष्टीने या भाज्यांनी भारतात आपलं घर केव्हाच केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img