संगीत विश्वाला हादरवणारी एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आसामची सुप्रसिद्ध गायिका आणि हजारो संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारी गायत्री हजारिका यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या कोलन कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर गुवाहाटी येथील नेमकेअर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगीतजगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गायत्री हजारिका या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या आसामच्या सांस्कृतिक विश्वाचा एक महत्त्वाचा भाग होत्या. त्यांनी गायलेली “ज़ोरा पाटे पाटे फागुन नामे” आणि “रति रति मोर ज़ून” ही दोन गाणी त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. त्यांच्या आवाजातली सहजता आणि गाण्यांतील आत्मा थेट श्रोत्यांच्या मनात उतरायचा. त्यामुळेच त्यांना केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण पूर्वोत्तर भारतात एक वेगळी ओळख मिळाली होती.
गायत्रींचं संगोपन आसाममध्ये झाल्यामुळे तिथल्या संस्कृतीशी त्यांचा अतूट नातं होतं. त्यांनी केवळ स्टुडिओमध्ये नव्हे तर अनेक थेट कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांच्या आवाजात एक प्रकारचं जादू होतं, जे कोणत्याही भाषेच्या पलीकडे जाऊन भावना पोहोचवतं.
त्यांचं निधन इतकं अचानक आणि धक्कादायक होतं की, अनेक चाहत्यांना त्यांच्या आजाराची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यांचा अधिकृत पेज 20,000 हून अधिक लोकांनी फॉलो केला होता, आणि प्रत्येक पोस्टवरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.
आजही त्यांची गाणी ‘विंक म्युझिक’, ‘गाना’, आणि इतर संगीत प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळतात. अनेक श्रोते म्हणतात, “गायत्री गेल्या असल्या तरी तिचा आवाज, तिचं संगीत अजरामर आहे.” संगीतसृष्टीतील ही अपूरणीय हानी कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना.