22.2 C
New York

India – pak War : पाकिस्तानची विश्वासघातकी कृती आणि भारतीय जनतेचा संताप

Published:

“जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” ही जुनी मराठी म्हण सध्याच्या भारत-पाकिस्तान परिस्थितीला अगदी तंतोतंत लागू पडते. अलीकडेच भारताने “ऑपरेशन सिंदूर” (Operetion Sindoor)द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईनंतर शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार करण्यात आला. अमेरिकेच्या मध्यस्थीने हा युद्धविराम शक्य झाला होता. यासोबतच दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवर संवादही झाला होता.

भारताकडून या शस्त्रसंधीचं प्रामाणिक पालन सुरू असतानाही पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली फितुरीची आणि विश्वासघातकी वृत्ती दाखवली. केवळ काही तासांतच पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ला करण्यात आला. एवढंच नाही तर जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या प्रकारामुळे भारतभर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

या घडामोडींमध्ये हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ चित्रपटातील एक संवाद पुन्हा चर्चेत आला आहे. ”कप्तान साहब, मुझे ऊन लोगो का तजुर्बा है. अगर जीत जाओ तो फैरन नापर्व नही हो जाना. पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है”. ओम पुरी आणि हृतिक यांच्यातील सवांद हा आजच्या घडीला फारच मिळताजुळता ठरत आहे.

शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर भारत-पाकिस्तान युद्धविरामाची माहिती दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानकडून ३. ३५ वाजता फोने आल्याचे सांगितले. त्या संवादानुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती.

“ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी ठिकाणांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. भारताकडून 100% युद्धविराम पाळण्यात येत असताना, पाकिस्तानने पावले उचलून पुन्हा तणाव निर्माण केला. सुरक्षा यंत्रणांनी नगरोटा येथील हल्ल्याचा वेळीच प्रतिबंध केला आणि दहशतवाद्यांना निष्फळ ठरवलं. या साऱ्या घटनांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणांचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img