26.9 C
New York

Amol Kolhe : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेबद्दल मोठा खुलासा; ‘शेवटाबाबत माझ्यावर दबाव होता’

Published:

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवपटावर आधारित ‘छावा’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटानंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही प्रसिद्ध मालिका सुद्धा प्रकाशझोतात आली आहे. या मालिकेसंदर्भात या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेबाबत आता त्यांनी खुलासा केला आहे.

अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपल्या युट्युब अकाऊंट वर एक व्हिडिओ पोस्ट करत, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता” असं म्हटलं आहे. ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. “माझ्यावर माध्यमांचा दबाव होता”. असा खुलासा त्यांनी केला आहे.

“मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं”आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का, असा प्रश्न मी आमच्या हेतूंवर शंका घेणाऱ्यांना विचारतो. मला अशा ट्रोलर्सची कीव येते.” असं ते म्हणाले.

दरम्यान, “‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण केल्यानंतर त्यांनी पाहिली. त्यामुळे 2019 च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img