18.8 C
New York

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा तडीपार

Published:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. १५ तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास उपोषण करणार असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला घेणंदेणं नाही, आपली भूमिका कायम आहे, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. आमची अशी इच्छा होती की, मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती.

बेमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुझ्यावर पडू देऊ नको, आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सर्व हाताने मदत केली. तू रंडकुंडीला आला होता, तुला ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागलं म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img