कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते, लोकसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये आता कोकणातल्या त्या रिफायनरीच्या (Narayan Rane On Nanar Refinery) मुद्द्यावरून अंतर्गत विरोधी मते असल्याचे दिसून आले आहे.
कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला असल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना व तशी चर्चा सुरू असताना नारायण राणे (Narayan Rane) यांचे हे विधान खूप महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय राणे यांनी बारसु रिफायनरी (Barsu Refinery Project) ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्या या विधानाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण असे की कोकणातले भाजप नेते हे राज्यातील सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. अशातच नाणार रिफायनरीचे समर्थक आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील झालेले पहायला मिळत आहेत.
Chh. Shivaji Maharaj : अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जागरण गोंधळ, तरीही सरकार पावले नाही
साल 2019 मध्येच नाणार येथील रिफायनरीसाठीची जमीन अधिग्रहण रद्द केले गेले होते. त्यानंतरच बारसूचा विषय मोठ्याप्रमाणात चर्चेत आला होता. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि निकालानंतर बार्शी येथे रिफायनरी होणार नाही, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्यासाठी नारायण राणेंंची महत्त्वाची भूमिका होती. अशातच नारायण राणे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? भाजपा नाणार रिफायनरीसाठी प्रयत्नशील आहे का? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.