मुंबईतील जोगेश्वरी येथील जय-जवान गोविंदा पथकाला शिस्तबद्ध मानवी मनोरे रचण्यासाठी ओळखले जात होते.
जय-जवान पथकाला गोविंदा पथकातील उपनगरचा राजा म्हटले जात होते.
परंतु शनिवारी झालेल्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम रचला.
ठाणे शहरातील वर्तकनगर भागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दहीहंडीमध्ये सकाळपासूनच मुंबई, ठाण्यातील पथक थर रचण्यासाठी येत होते.
यामध्ये शनिवारी दुपारीच बाजी मारली ती जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने. या पथकाने तब्बल १० थर रचले. विशेष म्हणजे, हे पथक देखील जोगेश्वरीचेच आहे.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम घडविला.
३८ वर्षीय विवेक कोचरेकर हे या पथकाचे प्रशिक्षक आहेत.
मागील १२ वर्षांपासून ते या पथकात कार्यरत असून प्रशिक्षण देत आहेत. हे पथक येथील जुन्या पथकांपैकी एक आहे.
हे पथक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने थर रचण्यात प्रसिद्ध आहेत.
२०१२ मध्ये त्यांनी सात थर लावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी आठ थरांचा सराव केला.
२०१५ मध्ये जय-जवान, ताडवाडी आणि आणखी एक पथक नऊ थर लावण्यासाठी प्रसिद्ध झाले होते.
श्री कृष्णजन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.