27.9 C
New York

Accident : अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडलं, बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

Published:

बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. (Accident) भीषण अपघात बीडवरून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर ही घटना घडली.

यावेळी एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात या अपघातात कोणीही जखमी झालं नव्हतं. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

Accident अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झालाय. तसंच, जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र, सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

बसमध्ये पाणी शिरल्यामुळे बस देखील बंद पडली. अचानक पाणी बसमध्ये शिरू लागल्याने प्रवाशांच्या चिंतेत काही वेळासाठी भर पडली होती. मात्र बार्शी शहर पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत या सर्व 27 प्रवाशांना बाहेर काढलं. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास घेतला. दरम्यान, बस मध्येच बंद पडल्यामुळे काही वेळ तुळजापूर – बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img